बळळारी : पती-पत्नीमधील भांडण मातेसह
[video width="544" height="960" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/06/VID-20250602-WA0405.mp4"][/video]
तीन निष्पाप मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.
भांडणामुळे संतापलेल्या पत्नीने आपल्या तिघां मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.
बळळारी जिल्ह्यातील कुरुगोडू तालुक्यामधील बरदनहळ्ळी गावात ही घटना घडली.
सिद्धम्मा (वय 30) असे मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सिद्धम्मा ही मूळची बेळगावची असून सध्या ती बरदनहळ्ळी येथे आपल्या पतीसह वास्तव्यास होती. पती कुमारसह ती शेळ्या-मेंढ्या पालन करायची. बरदनहळ्ळी येथील राघवेंद्र यांच्या शेतात ते तात्पुरती वस्ती करून वास्तव्यास होते.
पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि वाद विकोपाला गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिद्धम्मा आपल्या तीन मुलांना घेऊन शेताकडे गेली. सायंकाळी उशीर झाला तरी पत्नी आणि मुले परत न आल्याने कुमारने शोधाशोध चालविली. यावेळी शेळ्या हौदाजवळ उभ्या असल्याचे पाहून त्याला संशय आला. त्याने पाण्यात उतरून शोधाशोध केली असता, पत्नी व तिघा मुलांचे मृतदेह आढळून आले.
पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून सिद्धम्माने हे टोकाचं पाऊल उचललं. तिने अभिग्ना (वय 8), अवणी (वय 6) आणि आर्य (वय 4) या मुलांसह शिवारानजीकचा तलाव गाठून मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा कयास आहे.
पोलिसांनी नातेवाईकांना यासंदर्भात माहिती दिली असून सिद्धम्माच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कुरुगोडू पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.