बळळारी : टिप्परला कारची धडक बसून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. बळळारी जिल्ह्यातील संदूर तालुक्यातील जयसिंगपूर भागात ही घटना घडली.

स्वाती (वय 5 ), बिंदूश्री (वय 4 ), आशा (वय 28 ) आणि जयलक्ष्मी ( वय 29) अशी अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत.
वरील चौघेजण लक्ष्मीपूर येथून होस्पेट या आपल्या मूळ गावी कार गाडीने चालले होते. यावेळी लोखंडी बार घेऊन जाणाऱ्या टिप्परलाओव्हरटेक करताना कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले कारची टिप्परला जोरदार धडक बसली. या अपघातात स्वाती, बिंदूश्री, आशा आणि जयलक्ष्मी यांचा मृत्यू झाला तर रमेश नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने कोप्पळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
संदूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.