LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

एलपीजी तुटवड्यामुळे उद्यमबागमधील उद्योगांवर संकटाचे सावट

बेळगाव : एलपीजी सिलिंडरचा तीव्र तुटवडा, कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ आणि कामगारांचे आपल्या गावी परत जाणे आदी समस्यांमुळे बेळगावची औद्योगिक नगरी उद्यमबाग मधील उद्योगधंदे अडचणीत आले असून या भागातील कारखानदारीला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे.


एलपीजी सिलिंडरचा तीव्र तुटवडा आणि कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ यामुळे अनेक उत्पादन युनिट्सना कामकाज कमी करावे लागत असून काहींवर अंशतः किंवा पूर्ण बंद होण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त होत आहे.


औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या मते, एलपीजी पुरवठ्यातील अनियमिततेमुळे विशेषतः पावडर कोटिंग आणि मेटल प्रोसेसिंगसारख्या गॅसवर अवलंबून असलेल्या उद्योगांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. अनेक युनिट्सना उत्पादनाच्या काही विभागांना तात्पुरते बंद ठेवावे लागत असून त्यामुळे उत्पादन घटले आहे आणि ऑर्डर पूर्ण करण्यात विलंब होत आहे. याचा आर्थिक प्रवाहावरही परिणाम होत आहे.
गेल्या वर्षभरात स्टीलसह इतर कच्च्या मालाच्या किमतीत 10 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च प्रचंड वाढला असून पूर्ण क्षमतेने उत्पादन करणे आर्थिकदृष्ट्या कठीण झाले आहे. नुकसान टाळण्यासाठी काही उद्योगांनी त्यांच्या काही विभागांचे कामकाज तात्पुरते बंद केले आहे.
उद्यमबागमध्ये सुमारे 10 हजार कामगार कार्यरत असून यामध्ये विशेषतः उत्तर प्रदेश, आसाम आणि बिहारमधील कामगार आहेत. रोजगारातील अनिश्चितता, कमी झालेले कामाचे दिवस आणि वाढलेला राहणीमान खर्च यामुळे हे . हे कामगार आपल्या मूळ गावी परतत आहेत. परिणामी कामगार टंचाई निर्माण होऊन उत्पादनावर अधिक परिणाम होत आहे.
अनेक उद्योगांनी तीन शिफ्टऐवजी दोन शिफ्टमध्ये काम सुरू केले असून काहींनी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटवले आहे. त्यामुळे उद्योगांची उलाढाल कमी होत असून लघु आणि मध्यम उद्योगांवर आर्थिक ताण वाढत आहे.
जागतिक अस्थिरता आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे ही परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करणे तसेच अखंड एलपीजी पुरवठा, कच्च्या मालाच्या किमती स्थिर ठेवणे आणि उद्योगांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना जाहीर करणे गरजेचे आहे. वेळेवर शासकीय मदत न मिळाल्यास उद्यमबागमधील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती